खरतर हे आधीच लिहणार होतो.पण कामात व्यस्त असल्याने जमले नाही.आजही कामावरुन आल्यापासुन जायच्या तयारीत वेळ कसा गेला कळलच नाही. उद्या सकाळी ५ला मला घर सोडायचे आहे.( कायमचे नाही हो )तरीही आता रात्री ००:२० ला ही पोस्ट लिहायला घेतोय कारण हे ब्लॉगजगत सुदधा एक दुसर घरच झाल आहे.त्यामुळे तुम्हा सर्व ब्लॉग मित्रमैत्रीणींना हे कळवणे जरुरीचे वाटले.तर मी पुढील ७ दिवसासांठी (२४ ते ३० जानेवारी) हया रोजच्या रॅटरेसपासुन दुर निसर्गाच्या कुशीत सांगली येथील चांदोली अभयारण्यात राहायला चाललो आहे.चांदोली अभयारण्याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल.खरंतर या जंगलात जाण्यात ‘रिस्क’ आहे.कारण हे जंगल वाघ,बिबटे,रानरेडे आणी मगर यांसा्रख्या हिंस्त्र प्राण्यांसाठी विशेष प्रसिदध आहे.पण पंकज (भटकंती ) च्या भाषेत माझी खाज आणी निसर्गाची ओढ मला तिथे जाण्यास प्रवॄत्त करते आहे.
आमचा सात दिवसांचा कार्यक्रम
याआधीही छोटेमोठे ट्रेक्स केले आहेत पण ते १-२ दिवसाचे, असा ७ दिवसाचा ट्रेक आयुष्यात पहिल्यांदाच करणार आहे.तसे रोहन आणी पंकज यांच्या ब्लॉग्समधुन बरेच मोठे मोठे ट्रेक्स अनुभवले आहेत.पण ’याची देही याची डोळा ’ हे सगळ पहिल्यांदाच अनुभवायला चाललो आहे. तर आमच्या इथे डी.ए.ई. स्पोर्टस ऍंड कल्चरल काउंसील दरवर्षी इंडीयन माउण्टेनीअरिंग फ़ाउंडेशनच्या साहाय्याने ट्रेकिंगचे आयोजन करतात.त्यासाठी कंपनी आम्हाला स्पेशल सी.एल. देते.(ट्रेक यश्स्वीरीत्या पुर्ण केल्यावर)फ़िरण्यासाठी कंपनीची सुट्टी आहे कि नाही मजा.तर याआधीही मी दोन वेळा यासाठी फ़ॉर्म भरला होता.पण दोन्ही वेळी माझा नंबर लागला नाही.तरीही यावर्षी मी परत फ़ॉर्म भरला आणी देवाच्या कॄपेने यावेळी माझा नंबर लागला म्हणतात ना, कोशीश करनेवालोकी कभी हार नही होती…
तर आमच्या ग्रुपमध्ये एकुण २० लोक असणार आहेत त्यात आमच्याकडचे आम्ही ५ जण आहोत आणी उरलेले १५ जण भारतातील वेगवेगळ्या भागातुन येतील.तशी भटकंतीची आणी निसर्गाची आवड आधीपासुन आहेच पण अस साहस कधी केल नाही.कारण या सात दिवसात आम्हाला काही किल्लेही चढायचे आहेत.त्यात तिसरया दिवशी जो प्रचितगड आम्हाला सर करायचा आहे त्याबद्दल इथे वाचुन काल थोडीशी फ़ाटली होती पण आता मी तयार आहे हे आव्हान स्विकारायला.त्यासाठी ही पोस्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली.बघुया पुढचे सात दिवस निसर्गाच्या सोबतीने कसे जातात ते.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच …तेव्हा निघतो आहे मी एक वेगळा अनुभव घ्यायला….
इब्न-ए-बत्तुता
बगल मे जुता
पहने जो करता है चुर्र~~~
हे गाण ऐकल असेलच तुम्ही,सध्यातरी बरयाच चार्टबस्टरस वर हेच गाण वरती आहे.इश्किया या विशाल भारद्वाज़च्या नव्या सिनेमातील हे गाण आहे.हो तोच तो कमिने वाला विशाल भारद्वाज़.चित्रपटसृष्टीत काही नाव अशी आहेत कि त्या नावासाठी आपण कोणताही सिनेमा बघायला तयार होतो.माझ्यासाठी तरी विशाल भारद्वाज़ हे एक असच नाव आहे.(काही वर्षापुर्वी रामगोपाल वर्माच नावही होत माझ्या हया यादीत पण आज त्याच रामगोपाल वर्माच नाव दिसल कि तो चित्रपट शक्यतो टाळतोच.त्यामुळे हे ’विशाल ’प्रेम कितपत अबाधीत राहील ते सांगता येत नाही)विशालबद्दल मी आधीही इथे लिहल आहे.त्याचा सिनेमा नेहमी काहितरी हटके असा असतो.’माचिस’ चित्रपटाच संगीत देण्यापासुन सुरुवात केल्यावर त्याने मागे वळुन पाहिल नाही,लेखक,निर्माता,दिगदर्शक अशी उत्तरोत्तर प्रगती करत तो आज इथे पोहोचला आहे.मागे मला बरयाच मित्रांनी विचारल होत कमिने तुला का आवडतो , काही खास तर नाहिये त्यात.तेव्हा मी त्यांना उत्तर दयायचो हा सिनेमा जरा वरच्या लेवलचा आहे नाही कळणार तुम्हाला त्यासाठी थोड वेड बनुन हा सिनेमा बघा आणी मग बोला.
इब्न-ए-बत्तुता
तर वर ज्या गाण्याचा उलैख केला आहे ते गाण मी बरयाच वेळा ऐकल होत.पण आज सकाळी असच ते गुणगुणत असतांना आमच्या श्री.बिनडोके (आता हे बिनडोके कोण ते मला विचारु नका) यांनी मला विचारल अरे गाण म्हणतो आहेस पण त्या ’इब्न-ए-बत्तुता ’ चा अर्थ माहित आहे का तुला.मग काय लगेच आपले गुगलास्त्र काढले आणी इब्न-ए-बत्तुता मंत्र म्हणत सोडले आंतरजालावर.तर इब्न-ए-बत्तुता हे मुस्लिम समाजातील मोरोक्को येथील सर्वात महान पर्यटकाच नाव.( खरतर त्याच पुर्ण नाव ’अबु अब्दुल्ला मुहम्मद इब्न अब्दुल्ला अल लवती अल तंजी इब्न बत्तुता ’ होत..बापरे)अवघ्या २१ व्या वर्षी प्रवासाला निघालेल्या इब्न बत्तुताने पुढील ३० वर्षे त्यावेळी ज्ञात असलेल्या जवळजवळ सगळ्याच मुस्लीम संस्कॄती असलेल्या देशांना भेट देण्यात घालवली.त्या काळी (ई.स. १३००) इतका प्रवास करण काही सोप काम न्वहत.हया सफ़रीत तो भारतातही आला होता.भारतात तो तब्बल ७ वर्षे राहिला होता व दिल्लीत काझी म्हणुन कामही केल होत. इब्न बत्तुता बद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.त्याच्या नावाचा सुप्रसिदध इब्न बत्तुता मॉल ही आहे दुबईला.
जरी हे पोस्ट ’इबन-ए-बत्तुता ’ गाण्यासाठी लिहलेल असल तरी मला या चित्रपटातील ’ दिल तो बच्चा है जी,थोडा कच्चा है जी ’ हे गाण खुप आवडते.नक्की ऐकुन बघा तुम्हालाही आवडॆल.बाकी पुढच्या आठवड्यात कळेलच विशालचा ’इश्किया’ काय रंग दाखवतो ते.सध्यातरी हया गाण्याची मजा लुटा…
Not everyone in this world has the fate to cherish the fullest form of love.
some are born,just to experience the abbreviation of it.
म्हणजे जगात सगळ्यांनाच परिपुर्ण प्रेमाचा आनंद उपभोगण्याच नशिब लाभत नाही,तर काही लोकांचा जन्म फ़क्त प्रेमाच संक्षीप्त रुप अनुभवण्यासाठीच झालेला असतो.मग वाचायला घेतल हे प्रेमाच संक्षीप्त रुप.पुढच्या पानावर लेखकाने लिहल होत..हे पुस्तक त्या मुलीच्या प्रेमळ आठवणींना अर्पण जिच्यावर मी प्रेम केल पण लग्न करु शकलो नाही.पुढे शायरी होती.
तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे
तुझे ढुंढते ढुंढते, मैने खुद को पा लिया…अनामिक
मग सरळ पुस्तक वाचायला सुरवात केली.अरे हो पुस्तकाच नाव राहिलच तर मी हे सगळ लिहतो आहे ते रविंदर सिंग याच ’आय टु हॅड ए लव स्टोरी ’ पुस्तकाबद्दल जे मी कालच वाचुन काढले. आणी वाचल्यावर का माहित नाही पण खुप अस्वस्थ झालो.माझच कोणीतरी मला सोडुन गेल्यासारख वाटल होत मला काल.असो आताही थोडा एकटेपणा वाटतो आहे मन उदास झाल आहे नक्की काय ते खरच मला मांडता येत नाहिये इथे.खरतर काल हया पुस्तकाचा शेवट होता होता डोळ्यात पाणी आल होत माझ्या.( थोडा हळवा आहे मी) हया पुस्तकाचा इम्पॅक्ट आहेच तसा.
हया पुस्तकाचा लेखक रविंदर सिंग हा इन्फ़ोसिसमध्ये काम करणारा २६ वर्षाचा युवक आहे.तो काही नियमीत लेखक नाहिये त्याच आतापर्यंत तरी हे एकमेव पुस्तक. त्याने त्याच मन हलक करण्यासाठी लिहलेली (आपल्या मनाला चटका लावुन जाणारी) त्याची प्रेमगाथा हया पुस्तकात त्याने मांडली आहे.त्यामुळेच पुस्तकाची भाषा सहज आणी सोपी आहे.पुस्तकाची सुरवात होते ती चार मित्रांच्या रियुनियन च्या प्रंसगाने.कामासाठी वेगळे झालेले कॉलेजातील हे मित्र एकत्र येतात जुन्या आठवणींना उजाळा देत देत ते लग्नाच्या मुददयावर येतात.कोणाच काही ठरल का ते एकमेकांना विचारतात.मग रविंदरचा एक मित्र त्याला शादी.कॉम बददल सांगतो.त्यानेही जाहिरात बघितलेली असतेच हया संकेतस्थळाची.मग हे माहाशय तिथे बरयाच जणींना रिकवेस्ट पाठवतात. हया संकेतस्थळावर अस भटकतांना त्याला खुशी नावाची एक मुलगी भेटते.
पुढे एकमेकांची मोबाइल नंबरची देवाण घेवाण होते.त्यांच्यात बरयाच गोष्टी सारख्या असतात.(अगदी जन्मापासुन)आणी अस बोलता बोलता एकमेकांना न भेटताच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.हळुहळु दोघे आपापल्या घरीही हयाबाबत कळवतात.दोघांच्या घरची संमती दे्खील मिळते.दिवसामागे दिवस जातात पण दोघांची प्रत्यक्ष भेट होत नाही,कारण तो असतो भुवनेश्वरला तर ती फ़रिदाबाद्ला.मग त्याला महिन्याभरासाठी कामानिमीत्त यु.एस. ला जायच असते.त्याची फ़्लाईट दिल्लीवरुन असते.मग त्यांच तिथे भेटायच ठरते.जसा फ़ोटो आहे तशीच असेल का वैगेरे हुरहुर लागलेली असतांनाच त्यांची भेट होते.तो तिच्या घरी जातो.यु.एस. हुन परतल्यावर तिच्या घरचे रविंदरच्या घरी येतात.साखरपुड्याची तारीख निश्चित होते.खुशी इतकी खुश असते कि मला साखरपुड्याची तयारी करायची आहे म्हणत ति त्याच्याबरोबर फ़ोनवर नीट बोलत सुदधा नाही.साखरपुड्याची तारिख अगदी जवळ आलेली असतांनाच खुशीला एक अपघात होतो.उपचार चालु असतांना ४-५ दिवसांनंतर खुशी सगळ्य़ाना सोडुन जाते.रविंदरला एकटा सोडुन….
हा पुस्तकाचा सारांश असला तरी पुस्तकातील बरेच प्रसंग वाचण्यासारखे आहेत.अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक वाचतांना आपण हे पुस्तक का वाचतो ते कळत नाही.पण तेच शेवटी आपल्याला सुरुवातीला वाचलेल्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहात नाही.रविंदरच्या भावविश्वात आपण पुर्णत: गढुन जातो. नारायण मुर्ती यांनी हे पुस्तक वाचुन दिलेली प्रतिक्रिया खुप बोलकी आहे ते म्हणतात.. “Simple,honest and touching”
तर रविंदरच्या हया संक्षिप्त प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक जरुर वाचा…