केल्याने रक्तदान…

आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.डोळ्याला न दिसणारया अणुरेणुंपासुन,समुद्राच्या तळापासुन,आकाशगंगेतील नवीन ग्रहांपासुन ते पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गो्ष्टींचा  उलगडा आपल्याला हया विज्ञानाने करुन दिला पण आपल्या अगदी जवळच्या आणि  अविरत कार्य करणारया एका यंत्राचे-मानवी शरीराचे गुढ अजुन विज्ञानाला पुरेसे उलगडता आलेले नाही. आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत राहील आहे.हयामुळेच अपघातामुळे , आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते,आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर  रक्तदानाला विशेष महत्व आहे आणि ते आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे.

मला तरी रक्तदानाचे महत्व पुर्ण पटले आहे म्हणुनच गेल्या चार वर्षापासुन वर्षाला किमान दोनदा तरी मी रक्तदान करत आलो आहे.इथे मी काही स्वत:चा मोठेपणा सांगत नाहीये तर मला हया गोष्टीचा खरच खुप अभिमान वाटतो.तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होते आहे ही भावना खरच खुप सुखावणारी आहे.रक्तदान केल्यावर  एक सुट्टी तर मिळतेच शिवाय  चित्रगुप्ताकडील आपल्या खात्यातील पुण्यांची बाकी वाढण्यासही मदत होते… 🙂 ज्या समाजाच आपण राहतो त्याच ऋण फ़ेडायचही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते.खर तर हया दानामुळे आपल काहीच कमी होत नाही कारण आपल्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्‍त वहात असते. रक्‍तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्‍त घेतले जाते. पुढील २४ ते ४८ तासात त्याचीही भरपाई शरीरात होते.रक्तदानामुळे आपल्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते त्यामुळे बरेचसे आजार (रक्‍तदात्याच्या रक्‍तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या करुनच ते रुग्णाला दिले जाते.) पहिल्याच पायरीवर कळण्यास मदत होते.

अस असल तरी मी कधीही रक्तदान शिबिरात रक्तदान करत नाही कारण मलातरी ही शिबीर विश्वासकारक वाटत नाहीत.  मागे अश्याच एका शिबीरात काम केलेल्या  एका ओळखीच्या व्यक्तीने सांगीतल की रक्तदानाचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांना थ्री स्टार हॉटेलमध्ये पार्टी देण्यात आली होती.असो शिबिराच्या नावाखाली रक्ताचा बिजनेस काही प्रमाणात का होइना चालु आहे असे मला वाटते.आपण तिथे रक्त देतो पण  गरजू व्यक्तिला ते नंतर विकत घ्याव लागत.मी आजपर्यंत एकदाच शिबीरात रक्तदान केल आहे .बाकी सगळ्या वेळी बदली म्हणुनच रक्तदान केल आहे.माझ्या जीवनशैलीप्रमणे माझा रक्तगटही बी + आहे. 🙂 गेल्याच महिन्यात रक्तदान केलेले असल्याने ८ सप्टेंबर नंतरच मी उपलब्ध होणार आहे.तेव्हा कोणाला गरज असल्यास मला जरुर संपर्क साधावा.(bcoolnjoy@gmail.com)खरतर केलेल्या दानाबद्दल कुठे वाच्यता करायची नसते पण तरीही मी इथे हे लिहल आहे कारण हे वाचुन कोणा एकालाही रक्तदान करावेसे वाटले तर हया लेखाचे सार्थक होइल असे मला वाटते.माझ्या मते रक्तदानाबरोबरच लोकांमध्ये नेत्रदान,त्वचादान,देहदान यासंबधीही जागृती व्हायला हवी.कारण आपल हे नश्वर शरीराचा काही भाग आपण मेल्यावर कोणाच्या कामी येत असेल तर चांगलच आहे ना…


रक्तादानासाठी आवश्यक पात्रता:

– १८ ते ६० वयोगटातील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते.
– वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे.
-हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
– रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे.
– उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
-तसेच मागील १६ वर्षात कावीळ, गेल्या वर्षभरात मलेरिया,कांजण्या किंवा एखादी शस्त्रक्रिया झालेली नसावी.हयाबरोबरच इतरही अनेक आजारांची शहानिशा करावी लागते.


खरतर काल बझवर खालील संदेश आला आणि मला हे लिहावेसे वाटले.त्या मुलीला कालच अनुजा सावे महेंद्र कुलकर्णी हयांनी रक्तदान केल आहे.तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही तिथे संपर्क करुन जरुर रक्तदान करा.

प्राची पाटकर या तरुण मुलीला लहान वयातच एका दुर्धर
आजाराशी लढा द्यावा लागत आहे .आतापर्यंत १७७ बाटल्या
रक्त देण्यात आले आहे;पण अजूनही ओ+ या रक्तगटाच्या
रक्ताची नितांत गरज आहे.जे कोणी रक्तदान करण्यास
इच्छुक असतील ,त्यांनी कृपया ९८२०१ ०९१६७ या क्रमांकावर
…स्मृती पाटकर यांच्याशी संपर्क साधावा

फ़ॉर माय आइज़ ऑन्ली…

१ डिसेंबरला ’दुरावा’ हि पोस्ट टाकुन तुमच्यापासुन दुर झालो होतो.त्यानंतर ४ जानेवरीला  5.+1 ते 3Ϊ मधुन परतलो या जगात. तेव्हा महेंद्रजी,तन्वीताई यांनी कुठे होतास इतके दिवस म्हणुन विचारल.मग ठरवल एक पोस्ट टाकुन सविस्तर लिहु यावर.(एक पोस्टही वाढेल माझी 🙂 ) तशी ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं महेंद्रजीनी सांगीतली होतीच.त्यापैकी एक देता आल असत,पण माझ थोडस वेगळ कारण असल्यानेच ही पोस्ट लिहायला घेतली.

तर ३ डिसेंबरची सकाळ होती  नेहमीप्रमाणेच संगणकासमोर बसलेलो असतांना डोळ्यांना थोडा त्रास होत असल्याच जाणवल.(अजुन तरी चष्मा लागलेला नाही मला) मग लगेचच स्वत:लाच प्रश्न विचारला “का बर होत असेल अस..? काय रे बाबा तुझा कोणता अवयव सर्वात जास्त काम करतो सांग बर…?  डोक्यात विचार आला अरे हाच अवयवावर तर मी जास्तीत जास्त कामाचा भार देत असतो.  डोक(आहे हो थोड्फ़ार 🙂 ) कान,हात, पाय,  हया सर्वांपेक्षा हाच अवयव आहे माझा जो अविरत काम करत असतो.कारण जास्तीत जास्त वेळ डोळे फ़ाडुन मी संगणकासमोरच असतो.(यासंदर्भात घरी तशीही नेहमी बोलणी खात असतोच)संगणकापासुन थोड दुर झालो की हेच डोळे कोणत्या तरी पुस्तकात खुपसतो.तिथल आपल कार्य संपल कि मनाच्या विरंगुळ्यासाठी हे इडियट बॉक्सकडॆ वळतात. कामावरही प्रचालन(operation) विभागात असल्याने नेहमी पॅनलवरील वेगवेगळे सिस्टम डेटा मॉनीटर करावे लागतात ते हया डोळ्यानीच. मग ठरवल यासाठी  काहितरी पाउल उचलायला हवीत म्हणुन.

तातडीने शरीरातील सर्व विभागीय अधिकारयांची  इजीएम(इमर्जन्सी जनरल मीटींग) बोलावली. अध्यक्षपदी श्री.मेंदु.बिनडोके होते तसेच नियंत्रण आणि शुदधीकरण विभागाचे श्री. स.दा. स्पंदने, दॄष्टी विभागाच्या कु. नयना बोलके,जनसंपर्क अधिकारी व खास प्रवक्ते श्री.वदन बड्बडॆ, श्रवण विभागातील श्री. का.न.उघडॆ ,श्वास व गंध विभागाचे श्री. वासु नाकपुरकर,प्रोसेस विभागातील श्री. हा.त. काहितरीकर,वाहतुक व दळणवळण विभागाचे श्री. पा.य.धावते ,कॅंटीनमधील  सौ. रुचिरा जिभे व श्री.दात्ता चावरे असे सगळेच जातीने हजर  होते. श्री. बिनडोके यांच्या परवानगीने कु. नयना बोलके यांनी आपली बाजु मांडायला सुरुवात केली.सर्वप्रथम त्यांनी मी वर उलैख केलेले चार मुददे (संगणक,पुस्तक,टी.वी.,साइटवरील पॅनल्स) अगदी तपशिलवार मांडले.

त्या पुढे म्हणाल्या डोळ्यांच महत्व कळत नसेल तर  डोळ्यांना पट्टी बांधून खेळायची आंधळी-कोशिंबीर  आठवा त्यात काही क्षणांसाठी पट्टी डोळ्यांवर बांधली कि आपली काय परिस्थीती होते ती आठवा, अशी  आंधळी-कोशिंबीर आयुष्यभर खेळावी लागली तर… म्हणुनच जग पाहण्याची दृष्टी देणाऱ्या डोळ्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल ? तुमच्या मॄत्युनंतर तुमच्या शरीराबरोबर जळुन जाणारे हेच डोळॆ जर अश्या कोण्या आयुष्यभर आंधळी-कोशिंबीर खेळणारयाला मिळाले तर त्याचे जिवनात कसे रंग भरले जातील याचा विचार करा असे म्हणत  त्यांनी नेत्रदानाचे सुदधा महत्व सर्वांना पट्वुन दिले. मग त्यांनी खाली दिले्ले इतर मुददेही सर्वांसमोर मांडले.

  • कधी कोणाच्या भेटीसाठी मन आतुर होते पण  वाट पाहातात ते डोळेच ..
  • सुखाचा क्षण असो वा दु:खाचा भरुन येतात ते हे डोळे…
  • लोक आपल्या डोक्याने वागतात पण बोलणी ऐकावी लागतात ती डोळ्यांना म्हणे ’आतातरी डोळे उघडा’….
  • कधी आपल्या नकळत पाणावतात तर कधी शब्दांच्या मर्यादा ओलांडुन  मनातल्या भावना आपोआप बोलुन जातात हे डोळे…
  • कधीच खोटे बोलत नाहीत ते डोळे…
  • जे आल्यावर किंवा गेल्यावर दु:खच होते ते डोळेच…
  • मुलींना पटवतांना मारले जातात ते हे डोळेच…
  • सुख,दु:ख,लाज,लबाडी,शालीनता,अधाशीपणा,वात्सल्य,प्रेम,राग,करुणा असे सगळेच भाव व्यक्त करतात ते डोळे…

सारेच जण हे ऐकुन अगदी भावुक झाले.कु. नयना यांचे विचार सर्वांनाच पटले. मग सर्वांच्या सहमतीने डोळ्यांना शक्य तितका आराम दयायचा असे ठरले.मग त्यासाठी सर्वात पहिल संगणकाचा वापर अगदी कमी करायचा अस ठरल.मग माझ्या मनाने सुदधा स्वत:ला आव्हान केल ऑरकुट,फ़ेसबूक,चॅटींग यांच वेड तर केव्हाच गेल आहे तेव्हा आता ब्लॉगींग बंद करुन बघायच जेणेकरुन  संगणकासमोर जास्त वेळ बसाव लागणार नाही.तेव्हा श्री. स्पंदने का माहित नाही पण किंचीत हसल्यासारखे वाटले.

तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हे करा: दिवसभरात चार-पाच मिनिटं डोळ्यांवर तळहाताची पोकळी धरून शांतपणे बसावं. याला पामिंग म्हणतात. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो. तासन्‌तास लेखन, वाचन आणि “समीप’ दर्शनामुळे भिंगाचे (लेन्सचे) स्नायू थकतात. दूर अंतरावरचं पाहताना ते शिथिल (रिलॅक्‍स) असतात, त्यांना विश्रांती मिळते. यासाठी अभ्यासाच्या खोलीला खिडकी हवी आणि मधूनमधून लांबच्या इमारती, दूरवर आकाशाकडे पाहायला हवं.अधिक माहीतीसाठी खालील संकेतस्थळांना जरुर भेट द्या.खुपच माहितिपुर्ण आहेत हि संकेतस्थळ.

http://www.enetrajyoti.com/marathi/m_index.htm

http://abstractindia.blogspot.com/2008/04/blog-post.html

खर सांगतो १४ डिसेंबर पर्यंत तर काहिच वाटले नाही कारण ओळखीची इतकी लग्न होती कि यादरम्यान कित्येक दिवस मला घरी जेवावच लागल नाही.याकाळात मध्येत ’काय वाटेल ते’ ला एक धावती भेट दिली होती.पण १४ तारखेनंतर मनावर नियंत्रण करण कठीण होवु लागल.मग ठरवल या वेड्याला आता कुठेतरी दुसरीकडे वळवायला हव.मग मी गिटार शिकायच ठरवल (जे माझ एक अपुर स्वप्न आहे.)लहानपणापासुनच गिटारबददल एक अनामिक आकर्षण आहे मला.मग त्यासाठी गिटार शिकवणारा शोधु लागलो पण आमच्या  भागात(बोईसर-पालघर) एकही  गिटार शिकवणारा मिळाला नाही.मग माझा एक मित्र नितेश मेहता जो  थोडॆफ़ार गिटार वाजवतो त्याच्याकडुनच गिटारचे धडे घ्यायला सुरुवात केली.

लय अवघड वाटला हो हा प्रकार पहिला सगळ्या स्केल शिका,त्यांचा पुर्ण सराव करा.गाण्याच्या कोर्ड्स लक्षात ठेवा.अजुन तरी सा रे ग म प ध नि सा,ट्विंकल  ट्विंकल,हॅप्पी बर्थडॆ टु यु यापुढे मजल गेली नाही माझी.लवकरच वेळ काढुन बाहेर कुठेतरी गिटार क्लास लावयचा विचार आहे.बघुया कितपत जमते ते.मनात ब्लॉगजगताची ओढ होतीच पण हया गिटारप्रेमामुळे दिवस जात होते.अशातच नविन वर्ष उजाडल आणि ब्लॉगवरील मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो.मग एकेक ब्लॉग वाचता वाचता जाणवल या सगळ्यांपासुन जास्त वेळ दुर राहु शकता येणार नाही आणि वाटल  इथुन आता परत  जाउच नये. तितक्यात  श्री.मेंदु. बिनडोके आणि श्री.स्पंदने यांची कोणत्या तरी विषयावर बैठक चालु असलेली दिसली.आणि थोड्याच वेळात ऑर्डर आली कि डोळ्यांची काळजी घेत वाचत रहा,खरडत रहा.आता मला कळल  श्री.स्पंदने   तेव्हा का हसले होते ते….. (दिल है के मानता नही)

सारांश: हा दवबिंदु असाच तुम्हाला त्रास देत राहणार...